नमस्कार मित्रांनो,
जर तुम्हाला तुमच्या आवडीचे कपडे घालता येत नसतील, चार मित्रांमध्ये तुमच्या वजनावरून तुमची मस्करी होत असेल, वजनामुळे तुम्हाला तुमचा वैयक्तिक आत्मविश्वास कमी होत असेल आणि आयुष्याचा साथीदार हा वजनदारच मिळणार असेल तर खरंच तुमच्या मनात हा विचार येत असेल…….
नको तो लठ्ठपणा !!!
आयुर्वेदानुसार आपल्या शरीरामध्ये रस, रक्त, मांस, मेद, अस्थी,मज्जा आणि शुक्र असे सात धातू असतात परंतु यापैकी जर मेद धातू अतिरिक्त चरबीच्या स्वरूपात आपल्या शरीरामध्ये साठत राहिला तर त्यापासून आपल्या शरीरामध्ये जी घटना घडते त्यालाच लठ्ठपणा म्हणतात.
ही अतिरिक्त चरबी शरीरामध्ये एका विशिष्ट भागांमध्ये साठत असते. पुरुषांमध्ये ही चरबी पोटाच्या ठिकाणी साठते तर स्त्रियांमध्ये ही चरबी कंबर मांडया आणि छातीच्या ठिकाणी साठत असते. लठ्ठपणा हा आजार शहरी भागांबरोबर ग्रामीण भागातही हल्ली बऱ्याच प्रमाणात दिसून येतो. पूर्वी हा आजार केवळ प्रौढ व्यक्तींमध्ये दिसत असे परंतु आता लहान मुले तरुण वृद्ध अशा सगळ्याच वयोगटांमध्ये लठ्ठपणा फार सामान्यपणे दिसून येतो. देशातील सुमारे २० ते ४०% प्रौढ आणि १० ते २०% बालके लठ्ठ आहेत.
लठ्ठपणा हा एक चुकीच्या जीवनशैलीचा आजार आहे आणि त्यातूनच इतर जीवनशैलीचे आजार उद्भवतात जसे उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, हृदयविकार, सांध्यांचे आजार, मणक्याचे आजार, वंध्यत्व आणि कर्करोग.
लठ्ठपणाची कारणे
लत्थपना केवल अति खन्यमुले होत नहि तर त्यचि एथरहि कर्ने आगेत
१. अनुवंशिकता
लठ्ठपणाच्या अनेक कारणांमध्ये अनुवंशिकता हे सगळ्यात प्रमुख कारण आहे जर आपले माता पिता हे शरीराने लठ्ठ असतील तर मुलांमध्ये देखील लठ्ठपणा हा अनुवंशिकतेमुळे येतो.
२. व्यायामाचा अभाव
दिनक्रम मध्ये ज्याप्रमाणे आहार महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे व्यायाम देखील महत्त्वाचा आहे शरीरात उर्जेचे निर्मिती आणि तिचा वापर याच्या तीव्र स्वरूपात असंतुलन झाल्याने लठ्ठपणा किंवा स्थूलपणा येतो. त्याचप्रमाणे बैठे जीवनशैली असल्यामुळे देखील ऊर्जेचे योग्य प्रमाणे वापर होत नाही आणि लठ्ठपणा वाढतो.
३. अयोग्य आहार
लहानपणापासूनच चॉकलेट आईस्क्रीम आणि मैद्याचे पदार्थ मुलांना दिल्यामुळे लठ्ठपणाची संप्राप्ती शरीरात सुरू होते. त्याचबरोबर पौष्टिक आहाराच्या नावाखाली जंक फूड पनीर चीज असे पदार्थ दिल्याने वजन वाढू लागते.
४. मानसिक तणाव
दैनंदिन आयुष्यामध्ये व्यक्तीला अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक समस्यांना समोर जावे लागते आणि शैक्षणिक कौटुंबिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या पार पाडण्यामध्ये अनेक प्रकारच्या मानसिक पार पाडण्यामध्ये अनेक प्रकारचे मानसिक ताण-तणावाला सामोरे जावे लागते त्यातूनच शरीरामध्ये काही हार्मोनल असंतुलन होते आणि व लठ्ठपणा वाढीला लागतो.
५. मंदा जठर अग्नी
आपण जो पण प्रकारचा आहार घेतो तो पचवण्यासाठी एक उत्तम मागणी असणे आपल्या शरीरात जरुरी आहे तरच त्या अन्नाचे पचन व्यवस्थित पर्यंत होते अन्यथा आपण जे काही अन्नपदार्थ खातो त्याचे चयापचय व्यवस्थित न झाल्यामुळे चरबीमध्ये त्यांना पदार्थांच्या रूपांतर होते आणि शरीरातील वजन वाढू लागते.
६. विटामिन डी ची कमतरता
विटामिन डी हे एक स्नेह पदार्थांमध्ये विरघळणारे जीवनसत्व आहे आणि जेव्हा आपल्या शरीरामध्ये विटामिन डी ची कमतरता होते तेव्हा आपले शरीर जास्त प्रमाणामध्ये स्नेह साठवायला लागतो की जेणेकरून भविष्यात जर विटामिन डी आला तर त्याला साठवण्यासाठी आपल्या शरीरामध्ये पुरेसे प्रमाणामध्ये स्नेह असावा या या तरतुदीने. आणि याच विटामिन डी च्या कमतरतेमुळे आपल्या शरीरातील वजन वाढीला लागते
७. होर्मोनाचे असंतुलन
आपल्या शरीरातील जर थायरॉईड हार्मोन कमी प्रमाणात असेल तर त्यामुळे देखील वजन वाढायला लागते त्याचबरोबर मानसिक तणावामुळे शरीरामध्ये कॉलिटी सोल हार्मोन वाडीला लागते ते देखील वजन वाढीचे कारण असू शकते स्त्रियांनी पुरुषांमध्ये हार्मोनचे असंतुलन बऱ्याच त्यांच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे होत राहते आणि हे एक प्रधान कारण ठरते वजन वाढणे मध्ये.
8. औषधींचे दुष्परिणाम
शारीरिक आणि मानसिक आजारांसाठी जे काही आपण औषधे घेत असतो या औषधांच्या चयापचयामध्ये देखील शरीरामध्ये असे काही घटक तयार होत असतात की त्यामुळे आपल्या लठ्ठपणा वाढू शकतो.
शरीराचे जास्तीचे वजन आणि लठ्ठपणा

लठ्ठपणा आणि आहार
लठ्ठपणा कमी करण्यासाठी आहार कसा असावा? आहार दिवसाच्या कुठल्या वेळेस घ्यायला पाहिजे ? आहार किती प्रमाणात घ्यायला हवा?
आहार घेतल्यानंतर काय गोष्टी करायला हव्यात?
हे योग्य पद्धतीने जाणून घेतले तर याचा थेट परिणाम आपल्या लट्ठपणा कमी होण्यावर होतो.
लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये एक बेसिक घटना घडणे आवश्यक असते ते म्हणजेच कॅलरीज ची कमतरता आपण जितक्या प्रमाणात कॅलरीज खात असतो आणि आपण जितक्या प्रमाणामध्ये कॅलरीज वापरतो यावर आपल्या शरीरामध्ये कॅलरीची कमतरता होणार की नाही हे अवलंबून असते.
आपल्या शरीरामध्ये कॅलरीजचे कमतरता होण्यासाठी…..
कॅलरीज कमी प्रमाणात घेतल्या पाहिजेत.
आणि शरीरात असलेल्या कॅलरीज जास्त प्रमाणात वापरल्या पाहिजेत.
लठ्ठपणा कमी करण्यासाठी सर्रासपणे पूर्वी घेत आहोत तोच आहार घेतला जातो आणि अतिरिक्त प्रमाणात व्यायाम करून त्या कॅलरीज जाळण्याचा प्रयत्न केला जातो परंतु जर तुम्हाला लठ्ठपणा खरंच कमी करायचा असेल आणि तो कमी झालेला लठ्ठपणा आपल्याला तसाच नियंत्रणात जर ठेवायचा असेल तर कॅलरीज नियमितपणे आपण कमी प्रमाणात घ्यायला पाहिजे.
कॅलरीज कमी प्रमाणात शरीरात जातील आणि लठ्ठपणा वाढणार नाही अशी तरतूद करूनच आपले पूर्वज आहार घ्यायचे आणि त्यांच्या आहारातील सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे मिलेट्स!!!
मिलेट्स म्हणजे काय?
सर्वसामान्यपणे भारतीयांमध्ये गव्हाची चपाती आणि तांदळाचा भात हेच खाल्ले जाते आणि सगळ्यांना वाटते की हेच योग्य किंवा हेल्दी अन्न परंतु या चांगल्या धान्य व्यतिरिक्त देखील आणखी काही धान्य आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते त्यालाच मिलेट्स म्हणतात.मिलेट्स मध्ये प्रामुख्याने नाचणी, बाजरी, ज्वारी, झंगोरा, कोदो, बॅरी चेना, कंगनी, कुटकी, मूग हे धान्य असतात.
मिलेट्स: गहू आणि तांदूळ साठी योग्य पर्याय
गहू आणि तांदूळ हे चांगले खाद्यपदार्थ असून देखील त्यामध्ये फायबरचे प्रमाण कमी असल्याने ते तितके फायदेशीर नसतात. गव्हाच्या पिठामध्ये २% पेक्षा कमी फायबर असते तर तांदळात फक्त ०.२% फायबर असते. ब्राऊन राईस मध्ये फायबरचे प्रमाण सुमारे ४% असते. फायबर कमी असल्यामुळे हे तांदूळ आणि गहू पोटात जाताच पचायला लागतात आणि ऊर्जा बाहेर पडू लागते. आपण स्वतःला उत्साही वाटू लागतो ते लवकर पचतात आणि शरीरात जास्त प्रमाणात ग्लुकोज सोडू लागतात. वजन आणि साखरेचे पातळी वाढल्याने लठ्ठपणा येतो, ,मधुमेहाचा धोका वाढतो, कोलेस्ट्रॉल वाढते आणि त्यामुळे गंभीर आजार होतात.
मिलेट्स आणि कॅलरीज
भरड धान्यांमध्ये कमी कॅलरी असतात भरड धान्यांचा आहारामध्ये समावेश केल्याने वजन कमी होण्यास मदत होते कारण हे दिवसभर ऊर्जेची पातळी चांगली ठेवण्यास मदत करते आणि त्यामुळे वजन वाढण्यामध्ये किंवा लठ्ठपणामध्ये जी संप्राप्ती शरीरामध्ये घडत असते ती म्हणजे वारंवार खात राहणे त्या वारंवार खाण्याला या भरड खाण्यामुळे प्रतिबंध होतो.
मिलेट्स आणि ग्लासमिक इंडेक्स
गहू आणि तांदळाच्या तुलनेमध्ये भरड धान्यांमध्ये ग्लासेमिक इंडेक्स कमी असतो त्यामुळे लठ्ठपणा असलेल्या रुग्णांसाठी हे चांगले असते.
मिलेट्स आणि फायबर
भरड धान्यांमध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते आणि त्यामुळे पचनांच्या बहुतांश तक्रारी ते दूर करतात आणि चुकीच्या किंवा चयापचयाच्या प्रक्रियेमध्ये असलेला अडथळा दूर होतो आणि लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते.
मिलेट्स आणि अँटिऑक्सिडेंट्स
भरड धान्यांमध्ये अतिशय जास्त प्रमाणामध्ये एंटीऑक्सीडेंट गुणधर्म राहत असल्याने शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यासाठी मदत होत असते त्याचबरोबर शरीर ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी झाल्यामुळे शरीरातील अवयवांचे जी Ageing Process होत असते ती देखील कमी होते. डिटॉक्स होण्यास मदत होत असते विशेषतः शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकत असल्याने लठ्ठपणा पुन्हा वाढण्याचा धोका कमी होतो.
मिलेट्स आणि मिनरल्स
मिलेट्समध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, लोह, जस्त आणि अत्यावश्यक निग्धांश असतात जे निरोगी रक्तदाब राखण्यास आणि रक्तवाहिन्यांच्या अभिसरण सुलभ करण्यास मदत करतात. एकूणच लठ्ठपणामुळे झालेले शरीरावरचे दुष्परिणाम कमी होण्यास मदत होते
मिलेट्स आणि ग्लुटेन
मिलेट ग्लुटेन मुक्त आहे ग्लुटेन संबंधित अतिसार आणि ग्लुटेन ऍलर्जीचे संबंधित इतर पाचन समस्यांनी ग्रस्त लोकांसाठी एक आदर्श धान्य आहे.
अशाप्रकारे, अचानक आहारामध्ये केलेला बदल आपल्याला कदाचित त्रासदायक ठरू शकतो त्यामुळे आपण आठवड्यातून किमान एकदा तरी तृणधान्य म्हणजे ज्वारी बाजरी नाचणी भगर याचे सेवन करील अशी असे ठरवले पाहिजे तरच आपल्या निरोगी शरीर ठेवण्यासाठी मदत होईल.
नको असेल लठ्ठपणा…. तर पोटात जाऊ दे, नाचणी, बाजरी, ज्वारीचा एक तरी दाणा !!!
वैद्य रुपेश आमले
एम.डी. आयुर्वेद
dramaleayurveda@gmail.com